Dnyaneshwarvlog.blog
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
प्रस्तावना: संत ज्ञानेश्वरांनी पैस खांबाला बसून त्यांनी ज्ञानेश्वरी पूर्ण केली. ज्ञानेश्वर पैस खांब हा धार्मिकच नाही तर सांस्कृतिक आणी सामाजिक दृष्टीकोणातून महत्वाचा आहे.आजच्या आधुनिक जीवनातही पैस खांब हि संकलपना आपल्याला सांगते की ज्ञान, समता आणी श्रद्धा या तीन गोष्टींच्या आधारावरच खरे जीवन जगता येते.
संत ज्ञानेश्वर यांनी आपल्या जीवनातून आणी ग्रंथातून भक्ती,ज्ञान आणी समतेचा मार्ग दाखवला आहे.
संत ज्ञानेश्वर महराजांचे जीवन :
संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म ई.स.१२७५ मध्ये आपेगाव येथे झाला.आपेगाव हे पैठण तालुक्यतील आसून जिल्हा छत्रपती संभाजी नगर आहे.
त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत व आईचे नाव रुक्मिणीबाई असे होते. त्यांचे गुरू निवृतीनाथ मणजे त्यांचे मोठे भाऊ होते.
संत ज्ञानेश्वर महराजांनी ई. स. १२९० च्या सुमारास त्यांनी आपला भावार्थदीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला.
ज्ञानेश्वरी हा ग्रंथ पैस खंभाखाली बसून त्यांनी लिहिला. पैस खांब हा नेवासा तालुक्यात येतो.
त्यांचे प्रमुख ग्रंथ पुढीलप्रमाणे :
ज्ञानेश्वरी ( ई.स. १२९० ) नेवासा
अमृतानुभव ( ई.स. १२४९ ) पैठण
चांगदेव पासष्टी ( ई.स.१२९५ ) आळंदी
असे त्यांनी ग्रंथ लिहले होते. मराठी भाषेत आणी सामान्य जनतेला समजेल अशा भाषेत ग्रंथ लिहिले. संत ज्ञानेश्वर महाराजांचे जीवन हे अल्पायूषी पण अत्यंत प्रभावी होते. त्यांनी मराठी भाषेला आत्मा दिला.तसेच वारकरी परंमपरेला दिशा दिली.
त्यांची शिकवनी आजही समाजाला मार्गदर्शन करते.
पैसखांबाचे महत्व : पैसखांब हा एक साधा दगडी खांब आहे. पैस खांभाखाली बसून संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ( भावार्थदिपीका) हा ग्रंथ लिहिला. म्हणून पैस खांब पवित्र मानला जातो.
वारकरी परंमपरेत हे स्थळ अत्यंत पूजनीय मानले जात आहे. भाविक भक्त तेथे येऊन भजन कीर्तन करतात. नेवासा तालुक्यातील पैस खांब हे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जिवनातील अत्यंत महत्वाचे स्थान ठरले आहे.
सांकृतिक वारसा: नेवासा तालुक्यातील पैस खांब हे मराठी भाषींकांसाठी अभिमानचे केंद्र ठरले आहे.
संत ज्ञानेश्वरांनी ई. स. १२९० मध्ये नेवासा तालुक्यातील पैस खंभाखाली बसून ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला.

टिप्पण्या